Ad will apear here
Next
‘समतोल साधणारा अर्थसंकल्प’

प्रा. डॉ. संजय चोरडिया
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया :

‘हा समतोल अर्थसंकल्प आहे. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, अॅनिमेशन या नव्याने विकसित होत असलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके बाहेरून आयात करावी लागतात. त्यावर लावण्यात येणारे आयात शुल्क योग्य नाही. अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळेल. इलेक्ट्रीकल वाहनांसाठी सवलती जाहीर केल्यामुळे पर्यावरण संवर्धनाला गती मिळण्याबरोबरच प्रदूषण मुक्त गाड्यांच्या निर्मितीमध्ये अनेक प्रकारचे इनोव्हेशन होतील. तसे झाल्यास २०२५ पर्यंत भारत हरितराष्ट्र होऊ शकेल. कर संरचनेमध्ये केलेल्या बदलांमुळे व्यवसाय अधिक पारदर्शी होतील. उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना अल्प प्रोत्साहन भत्ता देऊन इंटर्नशीपसाठी प्रवृत्त केल्यास उद्योगांना आवश्यक रोजगारक्षम व कौशल्यभिमुख मनुष्यबळ उपलब्ध होईल.’

कल्याण जाधव
केजे शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष, कल्याण जाधव :

‘शेतकरी, तरुण वर्ग, नोकरदार यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे देश सक्षम बनेल आणि आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करेल. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांवर भर दिला असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन मिळेल;तसेच तरुण वर्ग स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यावर भर देईल. उच्च शिक्षणासाठी ४०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र, शिक्षण क्षेत्रावर अजून भर द्यायला हवा होता. सवलतीच्या दरात उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासह शिक्षकांच्या सक्षमीकरणावरही लक्ष द्यायला हवे. क्रीडा मंडळामुळे मुलांमध्ये क्रीडागुण विकसित होण्यास मदत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे’.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVICC
Similar Posts
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
‘गृहखरेदीला चालना देणाऱ्या तरतुदी स्वागतार्ह’ ‘निर्मला सीतारामन यांनी केवळ लोकप्रिय घोषणा टाळून सादर केलेला हा अर्थसंकल्प हा नवभारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवरील एक पाऊल ठरेल हे निश्चित.
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे : सगळीकडे मंदीची चर्चा सुरू असताना, पुण्यात ‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात ४५ कंपन्या आणि हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली. यातून साधारण २५० उमेदवारांना १२ ते ४० हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language